तिन्ही पक्षाचे नेते एकत्र महाराष्ट्र दौरा करणार, महाविकास आघाडीचा निर्णय

मुंबई, ३ ऑगस्ट २०२३ : महाविकास आघाडीची मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार अनेक आमदार या बैठकीला हजर होते. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी यावेळी सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. जे सोडून गेले त्यांची चिंता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोळा ऑगस्टरपासून महाराष्ट्र दौरा करतील आपणही त्याच धरतीवरती दौरा करायचा आहे, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.येत्या १५ ऑगस्टनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बैठकीनंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

तीनही पक्षांनी एकत्र फिरायचे, एकत्र लढायचे, एकत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायच्या, एकत्र राहायचे, एकत्र वज्रमूठ सभा घ्यायच्या, अशी चर्चा झाली. या सरकारने खोटा प्रचार करुन लोकांना फसवले आहे त्याचा पर्दाफाश करायचा, असेही या बैठकीत ठरले आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर सांगितले.राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.आम्ही तीनही मित्रपक्ष एकत्र लढणार आहोत. जनमानस आमच्याबरोबर आहे. आम्ही आता काही काळाने विभागवार बैठका सुरु करु. लवकरच वज्रमूठच्या सभादेखील सुरु होतील, आमच्या सरकारकडून योग्य उत्तराची अपेक्षा आहे. पण त्यांच्याकडून जसं उत्तर अभिप्रेत आहे ते टाळत आहेत, अससेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा