गोल पोस्ट इतर राजकारण विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी संभ्रमात; उद्धव ठाकरे गट नेहमीच त्याग करू शकत...

विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी संभ्रमात; उद्धव ठाकरे गट नेहमीच त्याग करू शकत नाही : संजय राऊत

मुंबई, १७ जानेवारी २०२३ : शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी सांगितले, की नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितल्यानंतर पक्षाने त्यांना निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच सदस्यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारीला संपत आहे. विधानपरिषदेच्या नवीन सदस्यांच्या निवडीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे, तर मतमोजणी दोन फेब्रुवारीला होणार आहे.

यावेळी राज्यसभा सदस्य राऊत म्हणाले, की या निवडणुकांच्या माध्यमातून उमेदवार निवडी आणि इतर महत्त्वाच्या निर्णयांबाबत महाविकास आघाडीमध्ये गोंधळ झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भविष्यात आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि असा गोंधळ निर्माण होऊ नये. महाविकास आघाडीबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास सर्वांना एकत्र लढावे लागेल. दरम्यान, पक्षाच्या सूचनेनुसार शिवसेना सदस्य गंगाधर नाकाडे (नागपूर)) यांनी उमेदवारी मागे घेतली.

श्री. राऊत म्हणाले, की उद्धव ठाकरे, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबळे (नागपूर मतदारसंघातून) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरची जागा शिवसेनेसाठी (शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोडण्यात आली होती; पण त्याग करण्याची जबाबदारी शिवसेनेवर आहे आणि विरोधी ऐक्यासारख्या महान शब्दांना महत्त्व देऊन आम्ही ते करीत आलो आहोत; पण आतापासून ते होणार नाही. आम्ही आमची भूमिका ठरवू, असे संजय राऊत म्हणाले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version