गोल पोस्ट क्रिडा विश्व राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, मोदींची घोषणा

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, मोदींची घोषणा

नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२१: केंद्रातील मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले आहे. हॉकीचे ‘जादूगार’ म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून सरकारने हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली.

पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये लिहिले, ‘देशाला अभिमान वाटणाऱ्या क्षणांमध्ये, अनेक देशवासियांची विनंती देखील समोर आली आहे की खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद जी यांना समर्पित केले जावे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता त्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नाव देण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांच्या कामगिरीने संपूर्ण देश रोमांचित झाला आहे. ते म्हणाले की, आता हॉकीमध्ये लोकांची आवड पुन्हा वाढली आहे जे येणाऱ्या काळासाठी सकारात्मक लक्षण आहे. खेलरत्न सन्मान अंतर्गत २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते.

ध्यानचंद यांचे हॉकीमध्ये अविश्वसनीय योगदान

मेजर ध्यानचंद, ज्यांना हॉकीचे ‘जादूगार’ म्हटले जाते, त्यांनी हॉकीमध्ये अविश्वसनीय योगदान दिले आहे. त्यांनी शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये (बर्लिन १९३६) एकूण १३ गोल केले. अशाप्रकारे ध्यानचंदने अॅमस्टरडॅम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑलिम्पिकमध्ये एकूण ३९ गोल केले, जे त्यांची उत्कृष्ट कामगिरी दर्शवते.

त्यांचा वाढदिवस (२९ ऑगस्ट) हा भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोच्च क्रीडा सन्मान खेळरत्न व्यतिरिक्त अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार दिले जातात. हा पुरस्कार १९९१-९२ मध्ये सुरू झाला.

ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाचा प्रवास भारतीय क्रीडा इतिहासाला अभिमानास्पद बनवतो. सलग तीन ऑलिम्पिकमध्ये (१९२८ आम्सटरडॅम, १९३२ लॉस एंजेलिस आणि १९३६ बर्लिन) भारताचे हॉकी सुवर्णपदक जिंकणाऱ्या ध्यानचंद यांचा सर्वांनाच अभिमान वाटतो.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला हॉकी संघांची ऐतिहासिक कामगिरी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला आणि पुरुष हॉकी संघांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर लोकांनी देशात पुन्हा हॉकीला प्रेम देण्यास सुरुवात केली आहे. पुरुष संघ ४१ वर्षानंतर पदक जिंकण्यात यशस्वी झाला, तर महिला संघाने प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरी गाठल्या. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये पुरुष संघाने शेवटचे पदक जिंकले. त्यानंतर संघाने सुवर्णपदकावर कब्जा केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version