महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसटी) एक वादग्रस्त निर्णय जाहीर केला आहे. नव्या परिपत्रकानुसार, नोकरीवर असताना शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या यादीतून वगळले जाईल. यामुळे हजारो कर्मचार्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
महामंडळाच्या नव्या नियमांनुसार, परवानगी न घेता नियमित किंवा पूर्णवेळ अभ्यासक्रमाद्वारे घेतलेली पदवी पदोन्नतीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच, असे शिक्षण घेणारे कर्मचारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील, असा इशाराही दिला आहे.
या निर्णयामुळे कर्मचारी संघटना आणि शिक्षण घेतलेले कर्मचारी तीव्र नाराज आहेत. मेहनतीने शिक्षण पूर्ण करून पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कर्मचारी संघटना आता हा निर्णय मागे घेण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे मागणी करणार आहेत.
विशेषत: या निर्णयामुळे कर्मचार्यांमध्ये असलेल्या उत्कंठा आणि असंतोषावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे, आणि महामंडळाच्या भविष्यातील निर्णयांवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले












































