नोकऱ्यांचा अभाव विकास खुंटण्याचे कारण: प्रियंका गांधी

नवी दिल्ली: आज देशातील युवक हेच देशाची मोठी ताकद आहेत. भाजपा सरकारने त्यांच्याकडून नोकऱ्यांची संधी हिरावून घेत युवकांवर मोठा अन्याय केला आहे. नोकऱ्यांचा अभाव हे देशाचा विकास खुंटण्याचे मुख्य कारण आहे. अशी टीका काँग्रेस नेत्या आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे.
देशात नव्या नोकऱ्यांची निर्मिती न होणं म्हणजे विकासाचा रथ थांबण्याची लक्षणं आहेत. भाजपा सरकारच्या कार्यकाळात या आजारानं मोठ्या आजाराचं रूप घेतलं आहे. बांधकाम क्षेत्रात तब्बल ३५ लाख लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जवळपास ४० लाख लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

देशातील युवकच देशाची मोठी ताकद आहेत. भाजपा सरकारनं त्यांच्याकडून संधी हिरावून घेऊन मोठा अन्याय केला असल्याचंही त्या म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर हल्लाबोल केला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा