अभाविपच्या वतीने तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

उस्मानाबाद, २७ ऑगस्ट २०२०: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुळजापूर शाखेच्या वतीने आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री यांना विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या तसेच अब्दुल सत्तार आणि उदय सामंत यांच्या राजीनाम्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

कोरोना विषाणू (कोव्हीड -१९) च्या प्रादुर्भाव व त्यामुळे
निर्माण झालेल्या टाळेबंदी मुळे राज्यातील सर्व क्षेत्रावर दुरगामी परिणाम झाला आहे व त्याला शिक्षणक्षेत्र देखील अपवाद नाही. मागील पाच महिन्याच्या काळामधील शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतू विद्यार्थ्यांकडून या सत्राचे परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करण्यात यावी.

सरासरी च्या सूत्रामुळे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे. नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शैक्षणिक शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्क घेऊन प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे. स्वायत्त (खाजगी) विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठीत करण्यात यावी. या संदर्भातील महाराष्ट्र स्तरावर निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता अभाविप महाराष्ट्रने शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत.

या प्रश्नांना घेऊन अभाविप महाराष्ट्रभर विविध विद्यापीठांचे कुलगुरू, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र भर मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट २०२० रोजी अभाविप धुळे शाखेचे कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट पालकमंत्री यांनी टाळली. म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पालकमंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस प्रशासनाने अमानुषपणे लाठीमार व बुक्यांचा मारा केला.

अभाविप या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करते व तसेच ज्यावेळी पोलिसांनी निर्दयी पणे लाठीमार व बुक्यांचा मारा विद्यार्थ्यांवर केला. त्यावेळी आलिशान कार मध्ये बसून बघ्याची भूमिका घेणाऱ्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे वचन देऊन नापास करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी अभाविप करते.

तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वरिल समस्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा अभाविप संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. यावेळी, प्रदेश सहमंत्री अंकिता पवार,शहरमंत्री पृथ्वीराज महामुनी,जिल्हा महाविद्यालय प्रमुख ऋषिकेश साळुंके,सौरभ कदम,योगीराज जाधव, राज भोरे,प्रतीक अंबुरे,गौरव जेवळीकर,शुभम काळे,रुपेश शिंदे यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा