उल्हासनगर मधील मदरसी पाड्यात एकास चाकूने मारून केले ठार

ठाणे, ३ जुलै २०२० – महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील रहिवाशाला चाकूने वार करून ठार मारण्यात आले या भांडणात त्याचे दोन मित्र देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी  एका २७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

उल्हासनगरमधील मदरसी पाडा भागात गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुल उर्फ ​​कांडी वाल्मीकी असे आरोपीचे नाव असून त्याने मयत विल्सन जाधव (३९) आणि त्याच्या दोन मित्रांवर काही किरकोळ प्रकरणावरून चाकूने हल्ला केल्याची माहिती एका पोलिस अधिका-याने दिली.

या हल्ल्यात विल्सनचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र- अविनाश नायडू आणि मुरुगन शेट्टी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे ठाणे पोलिस प्रवक्त्या सुखादा नारकर यांनी सांगितले.

राहुल वाल्मीकीला अटक करण्यात आली असून पोलिस सचिन वाल्मीकी अशी ओळख असलेल्या आणखी एका आरोपीचा शोध करीत आहे,” असे सुखदा नारकर म्हणाल्या.

दोघां आरोपींच्या विरोधात आयपीसी कलम ३०२ (खून),३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि इतरा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नारकर यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा