‘विरोधक एकत्र निवडणूक लढतील, देशात परिवर्तन होईल’ – शरद पवारांचं मोठं वक्तव्य

6

पुणे, १० जून २०२३: लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र निवडणूक लढतील आणि देशात परिवर्तन घडेल, असे शरद पवार म्हणाले. मत्र, २३ जूनला आपण सर्वजण बसून विरोधकांना बळकट कसे करता येईल यावर चर्चा करू. २३ जून रोजी पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे .

शरद पवार म्हणाले की, एकही दिवस असा जात नाही की जेव्हा देशाच्या एका भागात महिला, अल्पसंख्याक आणि दलितांवर अत्याचार होत नसतील. आज देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेतकऱ्यांची आहे. आज शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांच्या भावात वाढ व्हावी यासाठी आपण निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळाला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे अशी व्यवस्था नाही. आज देशातील नवीन पिढीसमोरील सर्वात मोठी समस्या बेरोजगारीची आहे. देशातील तरुण आज हतबल झाला आहे.

आज भाजप सत्तेत आहे, पण देशातील सर्वसामान्य नागरिक मग ती महिला असोत, आदिवासी असोत की दलित असोत, हे सरकार आम्हाला न्याय देत नाही हे सर्वांनाच समजले आहे. भाजपने दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत, त्यामुळेच आता अनेक राज्यांत भाजपची सत्ता नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत असून यासंदर्भात विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, आता पाटण्यातील सभेकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा