उद्योग जगताला इतिहास बदलण्याची संधी : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, दि. १८ जून २०२० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वावलंबी भारत अभियानांतर्गत खासगी क्षेत्रासाठी ४१ कोळसा खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारत कोरोनाशी लढा देईल आणि पुढची वाटचाल देखील चालू ठेवल. भारत ही मोठी आपत्ती एका संधीमध्ये बदलेल. या संकटाने भारताला स्वावलंबी भारत होण्याचा धडा शिकविला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की स्वावलंबी भारत म्हणजेच भारत आयातीवरील आपले अवलंबन कमी करेल. स्वावलंबी भारत म्हणजे भारत लाखो कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत करेल. स्वावलंबी भारत याचा अर्थ असा आहे की भारताला आयात करण्याची गरज नाही, यासाठी तो आपल्या देशात साधने आणि संसाधने विकसित करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ऊर्जा क्षेत्रामध्ये भारत स्वावलंबी होण्यासाठी आज एक मोठे पाऊल उचलले जात आहे. एका महिन्यात प्रत्येक घोषणा प्रत्येक सुधारणा मग त्या कृषी क्षेत्रातल्या असोत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील असोत किंवा आता कोळसा आणि खाण क्षेत्रातील असो जलद गतीने राबवल्या जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या आपत्तीला संधीमध्ये बदलण्यासाठी भारत किती गंभीर आहे हे दिसत आहे. आज आपण फक्त खासगी क्षेत्रातील कोळसा खाणींचा लिलाव सुरू करीत नाही, त्याऐवजी, अनेक दशकांच्या लॉकडाऊनमधून आपण कोळसा क्षेत्राला बाहेर काढत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मजबूत खनन आणि खनिज क्षेत्राशिवाय आत्मनिर्भर भारत शक्य नाही, कारण खनिज व उत्खनन हे आपल्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. या सुधारणांनंतर आता कोळसा उत्पादन आणि संपूर्ण कोळसा क्षेत्रही एक प्रकारे स्वयंपूर्ण होऊ शकेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा