लोकशाहीचे रक्षण करा:  राहुल गांधी

नवी दिल्ली, २६ जुलै २०२०: “लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी” नागरिकांनी आवाज उठवावा असे, आवाहन करत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी आपल्या  पक्षाच्या  ” Speak Up For Democracy”  या मोहिमेची सुरूवात केली. ट्विटरवर वर , कॉंग्रेस नेते राहुल गांधी  “चला लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवूया” या मथळ्यासह एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात कॉंग्रेसने भारतीय जनता पार्टीवर “संविधान फाडणे”, “लोकशाही नष्ट करणे” आणि “राजस्थानातील लोकशाहीची हत्या” असे गंभीर आरोप केले आहेत.

“आज, जेव्हा संपूर्ण राष्ट्र कोरोनव्हायरस विरूद्ध लढा देत आहे, तेव्हा भाजपा आमची लोकशाही पाडत आहे. २०१८ मध्ये राजस्थानच्या लोकांनी कॉंग्रेसचे सरकार निवडले होते. मध्य प्रदेशात असेच काम केल्यावर आज लोकशाही पद्धतीने निवडून आलेले  कॉंग्रेस सरकार पाडण्याचे कट भाजपकडून रचले जात आहे. राजस्थानात लोकशाहीचा खून करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. “भाजपाने लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारांना पाडणे थांबवावे अशी आमची मागणी आहे.” आमच्या घटनात्मक अधिकारांमध्ये तातडीने विधानसभा अधिवेशन बोलण्याची आमची मागणी आहे.  

आपला आवाज उठविण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ”स्पीकअप फॉर डेमोक्रेसी” मध्ये सामील व्हा, ”असे त्यात नमूद केले. ‘राहुल गांधी यांनी शुक्रवारी राजस्थानमध्ये आपले सरकार पाडण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप केला होता. सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातले  मतभेद उघड झाल्यावर राजस्थान राजकीय पेचात अडकले होते . त्यानंतर पायलट यांना राजस्थानच्या  उपमुख्यमंत्री पदावरून हटविण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा