राज्यातील शेत्मकऱ्यांचं दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ

मुंबई : दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे बिना अटी सरसकट कर्ज माफी करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी राज्य सरकारने नियमित कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
‘राज्यातील शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर 2019 पर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी शर्ती घालण्यात आलेल्या नाही. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाऊन हेलपाटे घालावे लागणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा