माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी मानांकन एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

माळेगाव (बारामती), दि. ९ जुलै २०२० : शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून (एन.बी ए.) मानांकन मिळवणे ही सर्व उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयांसाठी काळाची गरज आहे.या मानांकनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सर्व महाविद्यालयांना वेळोवेळी निर्देश देण्यात येत आहेत. या अनुषंगाने राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून मानांकन मिळवण्यासाठी २८ जूनला एकदिवसाीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

बारामती माळेगाव साखर कारखान्याच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांत्रिकी विभागा तर्फे करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ.एस. एम.मुकणे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव प्रमोद शिंदे तर कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य
मुकणे यांनी केले. यावेळी एस.आर.ई.एस. इंजिनिअरिंग कॉलेजचे विभागप्रमुख डॉ.अजयकुमार ठाकूर उपस्थित होते.

कार्यशाळेसाठी देशातील विविध राज्यातील तसेच इथोपिया व नायजेरिया या देशांमधून मिळून एकूण १०२५ लोक सहभागी झाले. कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे ट्रेनिंग ऑफिसर डॉ.माधव राऊळ यांनी महाविद्यालय व होणारी प्रगती सादर केला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या मानांकन फायदे व महत्त्व विषयी प्राचार्य डॉ मुकणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच एन बी ए मानांकन विषयी माहितीचा फायदा होईल असे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे वक्ते डॉ.अजयकुमार ठाकूर यांनी मानांकन मिळण्यासाठी विविध विषयांवर सादरीकरण केले.यामध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची गुणवत्ता पडताळणी साठी लागणारे एकूण दहा निकष व परिमाणाचे मूल्यांकन यावर विस्तृत माहिती दिली. कार्यशाळेतुन शैक्षणिक गुणवत्तेसाठी तंत्रज्ञानाचा वापर,विविध माहितीचे संकलन, अध्यापन-अध्ययन सुधार याविषयी सध्या असलेल्या शैक्षणिक व तांत्रिक शंकांचे निराकरणही केले. त्याचबरोबर एनबीएचे मानांकन मिळवण्यासाठी विविध स्तरावर येत असलेल्या अडचणींवर मार्गदर्शन केले.

डॉ. अजयकुमार ठाकूर यांनी सर्व सहभागींना मार्गदर्शन केले.एनबीए मानांकन मिळाल्यामुळे होणाऱ्या फायद्यामध्ये त्यांनी शासनाकडून विविध उपक्रमांद्वारे महाविद्यालयाला व संशोधन उपक्रमाला मिळणाऱ्या अर्थसहाय्याविषयी, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या फायद्याविषयी माहिती सादर केले. कार्यक्रमासाठी प्रा.इफ्तिकार पटेल, प्रा. हरिष फडतरे व यांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचलन डॉ. माधव राऊळ यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ. सुशिल पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब तावरे संस्थेचे सचिव श्री.प्रमोद शिंदे यांनी प्राचार्य , विभाग प्रमुख व कार्यक्रम समन्वयक यांचे विशेष कौतुक केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा