निवृत्त सैनिकाने दिला “श्रेया”ला मदतीचा हात

पुणे : शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य त्या स्वराज्यात गडकिल्ल्यांच्या अनन्यसाधारण असे महत्व आहे. अशा गड किल्ल्यांवर फिरायला जाणे किंवा भेट देणं म्हणजे एक ऊर्जा निर्माण होण्यासारखं आहे. परंतु एका भारतीय सैन्यात १७ वर्ष नोकरी केल्यानंतर एका निवृत्त जवानाला एका चिमुरडीच्या वेदना एकूण तो भारावून गेला. त्या निवृत्त जवानाचे नाव आहे रमेश खरमाळे. तिची कहाणी एकूण त्या विद्यार्थिनीला त्यांनी शिक्षणासाठी मदतही केली.

रमेश खरमाळे हे सुवेळा माची ते संजीवनी माची ट्रेक करत असताना त्यांना एक मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात. ती राहणारी पाली गावची. घर जवळपास तोरण्याच्या सिमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत असतांना मला दिसली. जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा तो जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या दहा ब्रिसलरी बाटल्या घेऊन ती वर चढत होती. थोडावेळ हे दृश्य पाहून मी सुन्न झालो व कॅमेरामध्ये छायाचित्र घेतले. कड्यावरून तीला गाठायचेच हा निर्धार मनाशी केला.
किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजिवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तूडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा कॅमेरातुन छायाचित्राच्या माध्यमातून टिपत टिपत शेवटी या चिमूरडीला गाठले. तोपर्यंत ती बरीचवर चढून आली होती. तिच्या जवळ पोहताच तीने आवाज दिला दादा सरबत,पाणी, ताक घ्या की. मी तिच्या डोईवरच गाठोड खाली घेत विचारलं, बाळा कुठची राहणार. पाली गावच नाव सांगितलं. शाळेत जातेस का? २ री मध्ये जातेय सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते निरूत्तर झालो व ह्रदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणुन सांगितले.
खरच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात. खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या. मी सरबत मुद्दामहून जास्त पीलो, पाण्याच्या बाटल्या घेतली. पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल, तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवले. आठवण म्हणून एक सेल्फि घेत त्या चिमुरडीच्या जिद्दिला मुजरा केला.
गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवयाला मिळाला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा