रेवणनाथ

ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वी अठ्यांयशी सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले;त्याच वेळीं जे थोडेंसे रेत पृथ्वीवर रेवानदीच्या तीरीं पडलें न्यांत चमस नारायणानें संचार केला; तेव्हां पुतळा निर्माण झाला.तें मूल सुर्यासारखें दैदीप्यमान दिसूं लागलें. जन्म होतांचत्यानें एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला. त्याच संधीस सहन सारुख या नांवाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्यानें तें मूल रेतीत रडत पडलेलें पाहिलें; तेव्हां त्याचें हृदय कळवळलें. त्यानें त्या मुलांस उचलून घेतलेंव घरीं नेलें आणि रेवातीरीं वाळवंटावर पुत्र मिळाल्याचें वर्तमान स्त्रीस सांगितलें व त्यास तिच्या हवाली केलें. तिनें आनंदानें त्यास स्नान घालून पाळण्यांत आपल्या पोटच्या मुलाशेजारीं निजविलें. तो रेवतीरीं रेवेतं ‘ सांपडला म्हणुन त्याचेंनांव ‘रेवणनाथ ‘ असें ठेविलें. त्यास थोड थोडें समजूं लागतांच तो काम करावयास बापाबरोबर शेतात जाऊ लागला.

तो बारा वर्षांच्या वयांत शेतकीच्या कामांत चांगलाच हुशार झाला.एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेंच उठून आपले बैल रानांत चरावयास नेत होता.त्या समयीं लखलखीत चांदणें पडलें होते;ह्यामुळें रस्ता साफ दिसत होता. इतक्यांत दत्तात्रेयाची स्वारीपुढें येऊन थडकली.दत्तात्रेयास गिरिनारपर्वतीं जावयांसहोतें. त्यांच्या पायांत खडावा असून त्यांनीं कौपीन परिधान केली होती, जटावाढविल्या असुन दाढी, मिशी पिंगटवर्णाची होती.असा तिन्ही देवांचा अवतारजे दत्तात्रेय ते जात असतां त्यांची व रेवणनाथाची भेट झाली.त्यास पाहतांच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचें स्मरण झालें. मग आपण पूर्वीचें कोण,व हल्लीचें कोण व कसें वागत आहों याची त्यास रुख रुख लागली.तसेच मला आतां कोणी ओळखत नाहीं, मी अज्ञानांत पडलों असें त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला.तेव्हां तूं कोण आहेस, असें दत्तात्रेयानें त्यास विचारल्यवर त्यानें उत्तर दिलें, तुमच्या देहांत तिन्ही देवांचे अंश आहेत; त्यांत सत्त्वगुणी जो महापुरुष तो मी असुन मला येथें फारच कष्ट भोगावे लागत आहेत; तर आतां कृपा करून या देहास सनाथ करावें. इतकें बोलून त्यांनें दत्तात्रेयाच्या पायांवर मस्तक ठेविलें.

त्याचा दृढनिश्चय पाहून दत्तात्रेयानें आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. नऊनारायणाच्या अवतांरांपैकीं हा चमसनारायणाचा अवतार होय, हे दत्तात्रेयास ठाऊक होतें.त्यास दत्तात्रेयानें त्यास वेळेस अनुग्रह कां दिला नाहीं अशी शंका येईल.पणत्याचें कारण असें कीं, भक्तिमार्गाकडे प्रवृत्ति झाल्यावांचून अनुग्रह देऊन उपयोग नाही; यास्तव भक्तीकडे मन लागलें म्हणजे ज्ञान व वैराग्य सहजसाध्य होतें असा मनांत विचार आणुन दत्तात्रेयानें फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली. तेव्हां रेवणनाथास परमानंद झाला. तो त्याच्या पायां पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रेय निघून गेले.एक सिद्धि प्राप्त झाली तेवढ्यावरच त्यानें समाधान मानल्यानें तो पूर्ण मुक्त झाला नाहीं.

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेणावी या गावात यांची समाधी आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा