कर्नाटकात हिजाबावरून गदारोळ! सरकारच्या गणवेशावरील नव्या निर्णयामुळं वादाची भडकली ठिणगी

कर्नाटक, 6 फेब्रुवारी 2022: कर्नाटकात सध्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वाद सुरू आहे. शाळेत हिजाब घालण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी विद्यार्थी भगवे स्कार्फ घालून निषेधही करत आहेत. आता एकीकडं या गोंधळामुळं मुस्लिम मुली नाराज झाल्या आहेत तर दुसरीकडे शाळेतील शिक्षणावरही परिणाम झाला आहे.

या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेत कर्नाटक शिक्षण कायदा 1983 चे कलम 133 लागू केले आहे. या कायद्यानुसार शाळेतील प्रत्येकाला एकच गणवेश परिधान करावा लागणार आहे. खासगी शाळांना स्वत:चा गणवेश निवडता येतो, त्यामुळं सरकारी शाळांमध्येही ठराविक गणवेश घालूनच यावं लागेल. आता या आदेशानंतर हिजाबचा वाद आणखीनच वाढला आहे.

मुस्लिम मुलींचं म्हणणं काय?

मुस्लीम विद्यार्थिनींचं म्हणणं आहे की ते हिजाब घालूनच शिक्षण घेत आहेत. याआधी कधीच यावरून वाद झाला नाही. त्यांच्या घरातील इतर महिलांनीही असाच अभ्यास केल्याचं सांगण्यात आलं, पण आता हिजाब अशाप्रकारे रोखला जात आहे. दुसरीकडं, शिक्षणाचा यूनिवॉर्मशी काहीही संबंध नाही आणि प्रत्येकजण शाळेत सारखाच राहिला पाहिजे, असं मानणारा एक वर्ग आहे.

या वादावर भाजपचे सीटी रवी यांनी शाळांमध्ये फक्त शालेय गणवेश अनिवार्य ठेवला पाहिजे असं म्हटलंय. विद्यार्थ्यांमध्येही दरी निर्माण करण्याचं काम काँग्रेस जाणीवपूर्वक करत आहे. मी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन करतो. शिक्षण त्यांचं भविष्य ठरवेल, गणवेश नाही. पण काँग्रेसच्या आमदार कनीज फातिमा या भाजप नेत्यापेक्षा वेगळा विचार करतात.

राजकारणाची सुरुवात कशी झाली?

त्या लिहितात की, जर मी हिजाब घालून कुठेही एन्ट्री घेऊ शकते तर या मुलींना का रोखलं जात आहे. शैक्षणिक संस्थांना अचानक भगवा रंग का दिला जात आहे? हिजाब हा आमचा हक्क आहे. आपण आपला जीव देऊ शकतो, पण हिजाब नाही. तसं, यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, काही लोक मुलींच्या शिक्षणादरम्यान हिजाब देखील आणत आहेत, यामुळं त्यांचं भविष्य अंधारात जाऊ शकतं.

वादाचं मूळ काय?

या सर्व वादाला या वर्षी जानेवारी महिन्यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानं सुरू झाला होता. कॉलेज प्रशासनाची मान्यता नसताना हा सर्व प्रकार करण्यात आला. पण नंतर हा ट्रेंड पुढं गेला आणि इतर कॉलेजमधल्या अनेक मुलीही असाच हिजाब घालून आल्या. त्यानंतर काही विद्यार्थिनींनी त्या निषेधाला प्रतिसाद म्हणून भगवे स्कार्फ बांधायला सुरुवात केली. इथून हा सारा वाद विकोपाला जाऊ लागला आणि त्यात राजकीय खेळीही झाली.

सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयातही पोहोचलं आहे. याप्रकरणी 8 जानेवारीला सुनावणी होणार आहे. उडुपीच्या प्रकरणातच न्यायालय मोठा निर्णय देऊ शकते. सध्या हिजाबचा वाद हा काँग्रेस विरुद्ध भाजप असा लढा बनला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा