संजय राऊत यांनी ठरल्याप्रमाणे खोट बोलण्याची प्रथा कायम ठेवली, संजय शिरसाट यांची टीका

औरंगाबाद, १४ ऑगस्ट २०२३ : नवी दिल्लीत एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युती तुटण्याबात केलेल्या वक्तव्यावरून सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून भाजपने विरोध केला. त्यामुळेच भाजप-शिवसेना युती तुटल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून शिंदे गट आणि भाजपकडून आता पलटवार केला जात आहे.

याचमुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. यावेळी शिरसाट यांनी, राऊत यांनी ठरल्याप्रमाणे खोट बोलण्याची प्रथा नेहमीप्रमाणे कायम ठेवलीय असे सांगताना, २०१९ मध्ये पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशी घोषणा उद्धव ठाकरे यांच्यासमोर कितीतरी सभांमध्ये झाली होती. पण त्यांनी त्यावेळी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तर सत्तेचे वाटप हे ५०-५०% व्हायला हवे हे सर्वांना मान्य होत, असे ते म्हणाले.

उध्दव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली होती. मात्र आमच्यातील काही पोपटपंच्यांनी एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर ते संघटना हातात घेतील, तुमचे महत्व कमी करतील असा किडा ठाकरे यांच्या डोक्यात भरला. तर शिंदे यांच्या नावाला कुठेही विरोध नव्हता. तर राऊत यांच्यासारख्यांचा कल हा युती तोडण्याकडे होता असा घणाघात संजय शिरसाठ यांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा