सकल हिंदू समाजाच्या निदर्शनादरम्यान संजय राऊतांची भाजपवर टीका

मुंबई, ३० जानेवारी २०२३ : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोन शक्तिशाली नेत्यांचे राज्य आहे, तरीही हिंदूंच्या हिताच्या रक्षणासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागेल, असे ते म्हणाले. अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्या मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येत आहे, ही अत्यंत शरमेची बाब आहे. रविवारी मुंबईत आयोजित सकल हिंदू समाजाच्या निदर्शनादरम्यान संजय राऊत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, की धर्मांतराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. लव्ह जिहादची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. हिंदू समाजातील लोक त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी लढत आहेत; मात्र सुनावणी होत नाही. देशातील मोदी-शहांसारख्या अत्यंत ताकदवान हिंदू नेत्यांच्या सरकारमध्ये हे घडत आहे. महाराष्ट्रातही त्यांचे सरकार आहे आणि संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने येथे निदर्शने केली जात आहेत. हिंदू हिताचे रक्षण करण्याची मागणी आहे. केंद्रातील भाजप आणि महाराष्ट्र सरकारसाठी ही शरमेची बाब आहे. हिंदूंना न्याय मिळत नाही ही भाजप आणि सरकारपुढे कोणती मजबुरी आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुंबईत हिंदूंच्या हिताच्या रक्षणासाठी निदर्शने करणाऱ्या सकल हिंदू समाज या संघटनेने मुस्लिमांनी चालवल्या जाणाऱ्या दुकानांतून वस्तू खरेदी करू नका, असे आवाहन केले. मुस्लिम धर्मांतर करीत आहेत. लव्ह जिहाद करीत आहेत, असं म्हटलं जातं. त्यांना धडा शिकवण्यासाठी बहिष्कार घालणे आवश्यक आहे. यावेळी राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले, की काश्मिरी पंडित अनेक महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत; मात्र त्यांनाही न्याय मिळत नाही. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकार कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्या मुलायमसिंह यादव यांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न करीत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा