गृहविभागाच्या आदेशाशिवाय असा लाठीमार होत नसतो, आमदार रोहित पवार

जालना २ सप्टेंबर २०२३ : गृहविभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो. पोलीसांमुळे मराठा आंदोलन चिघळल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

अंतरवाली सराटी येथील घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाकाळा अंकुशनगर तालुका अंबड येथील मनोज जरांगे यांच्या कुटुंबीयांची आज पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास भेट घेऊन धीर दिला आहे.

जालना शहरात ८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अडचण आली असती. त्यामुळे हे आंदोलन दडपण्यात आले आहे. गृह विभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. पोलिस प्रशासनामुळे प्रकरण चिघळल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यावेळी पदाधिकारी, आंदोलक उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा