T-20 मध्ये टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण? विराट कोहलीचे संकेत

पुणे, ९ नोव्हेंबर २०२१ : टीम इंडियाने सोमवारी T-20 वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना खेळला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा T-20 फॉरमॅटमधील शेवटचा सामना ठरला, त्यामुळे हा एक अतिशय खास क्षण होता. विराट कोहली म्हणाला की, भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण बनू शकतो, याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत.

नाणेफेकीच्या वेळी विराट कोहली म्हणाला, माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे काम मी केले आणि ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यासाठी जागा तयार करण्याची हीच वेळ आहे. टीम इंडियाने केलेल्या कामाचा त्याला अभिमान वाटतो.

आता वेळ आली आहे की संघाला पुढे नेण्याची जबाबदारी आगामी गटाची आहे. रोहित शर्माही इथेच आहे, तो काही काळापासून सर्व काही पाहत आहे. तसेच संघात अनेक खेळाडू आहेत, त्यामुळे येणारा काळ भारतीय क्रिकेटसाठी चांगला आहे.

या स्पर्धेनंतरच बीसीसीआय T-20 फॉरमॅटच्या नव्या कर्णधाराची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. या शर्यतीत रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. विराट कोहलीचे एकदिवसीय कर्णधारपदही जाऊ शकते, त्यामुळे पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटसाठी एक कर्णधार असेल आणि कसोटी फॉरमॅटसाठी विराट कोहली कर्णधार असेल, असे वृत्त आहे.

विश्वचषकापूर्वी केली घोषणा

T-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने या फॉरमॅटमध्ये पुढे कर्णधार नसल्याची घोषणा केली होती. आता भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकलेला नाही, तर नामिबियाविरुद्धचा शेवटचा सामना खेळला गेला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा ५० वा T-20 सामना आहे.


विराट कोहलीशिवाय प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचाही हा शेवटचा सामना आहे. T-20 विश्वचषकानंतर माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

 

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा