Ind Vs Wi 3rd T20, ३ ऑगस्ट २०२२: टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने भारताला १६५ धावांचे लक्ष्य दिले होते, जे टीम इंडियाने सहज गाठले आणि सामना ७ विकेटने जिंकला. आता भारत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत २-१ ने पुढे आहे.
या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी 76 धावांची तुफानी इनिंग खेळली. सूर्याला सलामीला पाठवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र त्यांनी सर्वांची बोलतीच बंद केली. आपल्या खेळीत त्याने ८ चौकार, ४ षटकार खेचले आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.
कर्णधार रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाल्याने सुरुवातीला पॅव्हेलियनमध्ये परतला होता, तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. सूर्यकुमार यादवशिवाय ऋषभ पंतनेही २६ चेंडूत ३३ धावांची नाबाद खेळी खेळली आणि शेवटी टीम इंडियाला विजय मिळवून देऊन परतला. या दोन डावांशिवाय श्रेयस अय्यरने २४ आणि हार्दिक पांड्याने ४ धावा केल्या.
भारताचा डाव – १६५/३ (१९ षटके)
रोहित शर्मा (११ धावा) निवृत्त दुखापत, १९/०
पहिली विकेट – श्रेयस अय्यर (२४ धावा) ११.३ षटके, १०५/१
दुसरी विकेट – सूर्यकुमार यादव (७६ धावा) १४.३ षटके, १३५/२
तिसरी विकेट – हार्दिक पांड्या (४ धावा) १७.२ षटके, १४९/३
सरतेशेवटी वेगवान फलंदाजीचे दर्शन
वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली, पण त्यांच्या विकेट मधेच पडत राहिल्या. मात्र, अखेरीस रोव्हमन पॉवेल (२३ धावा) आणि शिमरॉन हेटमायर (२० धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे धावसंख्या १६४ धावांपर्यंत पोहोचली. या दोन फलंदाजांनी मिळून १९ चेंडूत ३४ धावांची भागीदारी केली.
काइल मेयर्सने वेस्ट इंडिजकडून ७३ धावांची मोठी खेळी खेळली, ज्यात त्याने ८ चौकार आणि ४ षटकारही मारले. या सामन्यात टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने २, तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने १-१ विकेट घेतली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे