तीन मुलींना विहीरीत ढकलून पित्याने केली आत्महत्या.

गांधी नगर: गुजरात मधील राजकोट मधून अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे. रसिक सोळंकी नावाच्या माणसाने आपल्या तीन मुलींना विहीरीत ढकलून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दिनांक २० डिसेंबर ला घडली. रसिक सोळंकी हे जुनागड चे रहवासी असून ते जीआरपी चे जवान आहेत. रसिक यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली आणि त्यांना तीन मुली होत्या, परंतु मुलाच्या अट्टाहासापायी त्यांची पत्नी चौथ्यांदा गर्भवती झाली. मात्र, चौथ्या वेळेस देखील रसिक यांच्या पत्नी ने मुलीला जन्म दिला, यामुळे रसिक अत्यंत दु:खी झाले.
दोन आठवड्यांपूर्वी रसिक यांच्या पत्नी ने चौथ्या मुलीला जन्म दिला आणि त्या नवजात बाळाला घेऊन त्यांच्या माहेरी गेल्या. या संधीचा फायदा घेत रसिक त्यांच्या तीन ही मुलींना गावाच्या बाहेर शेतात घेऊन गेला. आणि १०० फुट खोल असणाऱ्या विहीरीत त्याने त्याच्या तीन ही मुलींना ढकलून दिल. तसेच त्याने स्वतः देखील शेतातील एका झाडाला लटकून गळफास घेतला.
शेतात काम करणाऱ्या मजूराने रसिक ला झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहून त्याचा भाऊ वाल्जी याला सांगितल. वाल्जी याने रसिक ला त्याच्या तीन मुली सोबत गावाच्या बाहेर जाताना पाहीले होते. मजुराच्या सांगण्यावरून वाल्जी तत्काळ शेतात गेला, तिथे त्याला झाडाला लटकलेला रसिक दिसला परंतु रसिक तीन मुली नाही दिसल्या म्हणून त्याने ताबडतोब त्या तिघींचा शोध घ्यायला सुरुवात केली.तेव्हा त्याला शेतातील विहिरीत तीन ही मुलींचा मृतदेह तरंगताना दिसला. तेथील स्थानिक लोकांच्या मदतीने त्या तीन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
तीन मुलीनंतर चौथी ही मुलगी च झाली यामुळे निराश होऊन रसिक यांनी असे पाऊल उचलले असं भेसन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम सी चुडस्मा यांनी सांगितल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा