कामगारांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात

जळगाव, दि.१९ मे २०२०: जळगाव जिल्ह्याच्या आरणी तालुक्यात आज ( मंगळवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत चालकासह चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला असल्याचे प्रतिनिधीकडून सांगण्यात आले आहे तर यात १५ मजूर जखमी झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या डंपरला एसटी बस धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ही एसटी सोलापूर येथून मजुरांना घेऊन झारखंडच्या दिशेने जात होती, पण दुर्दैवाने वाटेतच हा अपघात झाला.

अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा