नवी दिली, २९ जानेवारी २०२१: गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतकरी नेते राकेश टिकैट म्हणाले की लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणारे लोक आंदोलन करणारे नाहीत. तिरंग्याचा अपमान सहन केला जाणार नाही. तसेच दिल्लीतील हिंसाचाराला षड्यंत्र म्हणत सर्वोच्च न्यायालयाकडून ३ मागण्या देखील केल्या. सिंघु आणि टिकरी बॉर्डर येथे पोलिसांचा भारी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील हिंसाचाराची चौकशी करावी, असे शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले. लाल किल्ल्यातील लोक कोण होते याचीही चौकशी केली पाहिजे. तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत आणि मागील २ महिन्यांतील कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत.टिकैत यांनी सांगितले की, मी शरण जाणार नाही. आमचा संप कायम राहील. ते म्हणाले की लाल किल्ल्याच्या घटनेस जबाबदार असणाऱ्यांची कॉल डिटेल समोर आणली पाहिजे.
गाझीपूर सीमेवर हिंसाचार नाहीः टिकैत
उत्तर प्रदेश पोलिस आंदोलन स्थळावरून अटक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राकेश टिकैत म्हणाले. सुप्रीम कोर्टानेही शांततापूर्ण निषेधाचे समर्थन केले आहे. उत्तर प्रदेश गाझीपूर सीमेवर कोणताही हिंसाचार झालेला नाही. असे असूनही, सरकार दडपशाहीचे धोरण स्वीकारत आहे. हा उत्तर प्रदेश सरकारचा चेहरा आहे.लाल किल्ल्यावरचे लोक कोण होते, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी याची चौकशी करावी, असे राकेश टिकैत म्हणाले. समितीने चौकशी करुन ध्वजवाहक कोण होते याचा शोध घ्यावा.
सिंघू सीमेच्या दिशेने जाणारा रस्ता ब्लॉक
गाझीपूर सीमेवर पोलिस बंदोबस्त प्रचंड प्रमाणात तैनात आहे. निषेधाच्या ठिकाणी प्रशासनाची टीमही हजर आहे. स्थानिक लोकही येथे हजर आहेत आणि रस्ता मोकळा करण्याची मागणी करत आहेत. तेथील स्थानिक सतत घोषणा देत आहे. स्थानिक लोक आंदोलन भडकवणाऱ्या लोकांना परत जाण्यासाठी घोषणा देत आहेत. तसेच दिल्ली पोलिस आणि यूपी पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, सिंहू सीमेकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडविण्यात आला आहे. येथे भारी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टीकरी सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
आत्महत्येची धमकी
टिकैत म्हणाले की, आधी आम्हाला ते अटक करणार होते. परेड दरम्यान बिजेपी नेत्यांनी आमच्यासोबत मारहाण केली. आमच्या लोकांना रस्त्यात मारहाण करण्याची योजना त्यांनी अखली. आता आम्ही येथून हलणार नाही. आम्ही येथेच राहणार आहोत.
शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी आत्महत्येची धमकी देखील दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना राकेश टीकैत अश्रू काढत म्हणाले की, ‘जर तिन्ही कृषी कायदे मागे घेतले गेले नाही तर मी आत्महत्या करेल. मला काहीही झाले तर यास प्रशासन जबाबदार असेल. मी शेतकऱ्यांना बरबाद होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना मारहाण करण्याची तयारी केली जात आहे. येथे षडयंत्र रचले जात आहे.’
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे













































