देशातील दुसरी आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात ‘ २०२० च्या अखेरीपर्यंत खोल समुद्रात

नवी दिल्ली, ८ सप्टेंबर २०२० : देशातील दुसरी आण्विक पाणबुडी २०२० च्या अखेरीपर्यंत खोल समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘आयएनएस अरिघात’ चे जवळपास तीन वर्षांपर्यंत समुद्रात ट्रायल सुरू होतं. २०१७ मध्ये या पानबुडीचं लॉन्चिंग अतिशय गुप्त पद्धतीनं पार पडलं होतं. या पाणबुडीचं नामकरण अगोदर ‘आयएनएस अरिदमन’ करण्यात आलं होतं परंतु, लॉन्चिंगच्या वेळी या नावात बदल करण्यात आलं.
अरिहंत क्लासची ही दुसरी पानबुडी वर्षाच्या अखेरीपर्यंत नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होऊ शकते.

विशाखापट्टनमच्या शिपबिल्डिंग सेंटरमध्ये अॅडव्हान्स टेक्नोलॉजी वेसल (ATV) प्रोजेक्ट अंतर्गत ही पाणबुडी तयार करण्यात आलीय. नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी ही पाणबुडी आता सज्ज झालीय.भारताची पहिली बॅलिस्टिक आण्विक पानबुडी ‘आयएनएस अरिहंत’ आहे. आयएनएस अरिहंत २००९ साली लॉन्च करण्यात आली होती. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ काळाच्या ट्रायलनंतर ती ऑगस्ट २०१६ मध्ये नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती.

आयएनएस अरिघातची वैशिष्टे…

या पानबुडीत सात ब्लेडचा प्रॉपेलर लावण्यात आलाय. प्रेशराइज्ड वॉटर रिअॅक्टरद्वारे तो काम करतो

समुद्राच्या पृष्ठभागावर ही पानबुडी प्रती तास १२-१५ नॉटिकल माईल (२२-२८ किलोमीटर) वेगाने प्रवास करू शकते

तर खोलवर समुद्राच्या पाण्यात याचा वेग २४ नॉटस् (४४ किलोमीटर) प्रती तास होतो

आयएनएस अरिहंत प्रमाणेच आयएनएस अरिघातमध्येही चार लॉन्च ट्युब आहे

आयएनएस अरिघात आपल्यासोबत १२ के – १५ सागरी मिसाईल वाहून नेऊ शकतात. या मिसाईलची रेंज ७५० किलोमीटर आहे

या पानबुडीवर चार के-४ मिसाईल तैनात केल्या जाऊ शकतात. या मिसाईलची रेंज ३५०० किलोमीटरपर्यंत आहे. सध्या के-४ मिसाईलच्या निर्माणाचं काम सुरू आहे

आयएनएसस अरिघात हेदेखील आयएनएस अरिहंत प्रमाणेच एक बॅलेस्टिक मिसाईल सबमरीन आहे. ६००० टन वजन आणि ११२ मीटर लांब ही पानबुडी देशातच तयार करण्यात आलेल्या ८० मेगावॅटच्या न्युक्लिअर पॉवर प्लान्टच्या सहाय्याने धावते. या पाणबुडीमुळे नौदलाची ताकद आणखीन वाढणार आहे.
शक्तीशाली भारतीय नौदल
जगातील सर्वात शक्तीशाली नौसेना असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक आघाडीवर लागतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा