आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जीवंत जाळले पाहिजे, अभिनेते मुकेश खन्ना यांची जळजळीत प्रतिक्रिया

मुंबई २३ जून २०२३: ‘आदिपुरुष’ म्हणजे रामायणातील भयंकर विनोद, असे वर्णन ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी अलीकडेच केले. आता एका मुलाखतीत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला जीवंत जाळले पाहिजे, असे म्हटले आहे. मला समजत नाही की ते स्वतःचा बचाव का करत आहेत? तुम्ही असा चित्रपट तयार केल्यानंतर, लोकांनी त्याला विरोध का करू नये? लोकांनो त्यांना माफ करू नका. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला जीवंत जाळले पाहिजे. अशी या मुलाखतीत, मुकेश खन्ना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते यांच्यावर सडकून टीका केली.

मुकेश पुढे म्हणाले की, मनोज मुंतशीर उत्तम लेखक आहेत, पण त्यांचे बालिश बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटते. मला वाटले होती की, संपूर्ण देश या चित्रपटावर टीका करेल तेव्हा ते तोंड लपवतील, पण ते म्हणतायत की, वाल्मिकी, तुलसीदास आणि रामानंद सागर यांच्यानंतर ही माझी रामायणाची आवृत्ती आहे. मग मला त्याला विचारायचं आहे की,अरे भाऊ तू कोण आहेस? तुम्ही वाल्मिकींपेक्षा मोठे आहात का? तुम्ही हनुमानाला चमड्याचे कपडे घातले. प्रभू रामांनाही चमड्याच्या चपला घालण्यात आल्या. रामाची मिशी असू शकत नाही, किंवा कृष्णाची विष्णूचीही मिशी असू शकत नाही, असे ते म्हणाले.

मुकेश यांनी चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांच्यावरही टीका केली, तुम्हाला माहिती आहे की, टी-सीरीजचे सर्वेसर्वा कोण होते. त्यांनी राम आणि सर्व देवांची भजने लोकप्रिय केली. त्यांचा मुलगा आज असे रामायण करतोय? वडिलांची परंपरा पुढे नेताय की नाव खराब करताय? असा सवाल त्यांनी या टीकेतुन विचारला. मुकेश यांच्याशिवाय आतापर्यंत इतर अनेक कलाकारांनीही या चित्रपटावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाला विरोध कायम ठेवत मुकेश यांनी देशवासीयांना, रामायणाच्या या आवृत्तीच्या निषेधात सहभागी होण्याची विनंती केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा