भारता कडून तुकडा तांदूळावर निर्यात बंदी, यामुळं घेतला सरकारने निर्णय

15

नवी दिल्ली, १० सप्टेंबर २०२२: देशातून तांदूळ निर्यातीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय. तसंच, देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने ८ सप्टेंबर २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे – ‘पीस तांदूळ निर्यातीची श्रेणी ‘मुक्त’ वरून ‘प्रतिबंधित’ मध्ये बदलली आहे. ही अधिसूचना ९ सप्टेंबरपासून लागू झालीय.

यांना मिळेल निर्यातीची परवानगी

हस्तांतरित धोरणाच्या संदर्भात विदेशी व्यापार धोरण २०१५-२०२० अंतर्गत तरतुदी या अधिसूचनेला लागू होतील. तसंच, ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत तुकडा तांदळाच्या काही मालाची निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल. अधिसूचनेनुसार, या कालावधीत केवळ त्या मालवाहू मालांना निर्यातीसाठी परवानगी दिली जाईल, ज्यांच्या जहाजांवर या अधिसूचनेपूर्वी लोडिंग सुरू झालंय.

सरकारने का लावले शुल्क ?

यापूर्वी सरकारने उसना तांदूळ वगळता बिगर बासमती तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावलं आहे. चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय घट झालीय. अशा परिस्थितीत देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. देशातील नागरिकांना तांदळाची कमतरता भासू नये त्यामुळं पुरवठा कायम ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महसूल विभागाच्या अधिसूचनेनुसार, तांदूळ आणि तपकिरी तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आलंय.

तांदूळ निर्यातीचे आकडे

देशातील काही राज्यांमध्ये कमी पावसामुळं भातशेतीचं क्षेत्र घटलं आहे. चीननंतर भारत हा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने २.१२ कोटी टन तांदूळ निर्यात केला. त्यात ३९.४ लाख टन बासमती तांदूळ होता. अधिकृत आकडेवारीनुसार, या कालावधीत गैर-बासमती तांदळाची निर्यात ६.११ अब्ज डॉलर होती. भारताने २०२१-२२ मध्ये जगातील १५० हून अधिक देशांमध्ये बिगर बासमती तांदूळ निर्यात केला.

शिपमेंटवर परिणाम होईल

भारत १५० हून अधिक देशांमध्ये तांदूळ निर्यात करतो. भारत सरकारच्या या निर्णयाचा जागतिक बाजारपेठेतील शिपमेंटवर परिणाम होणार असून त्यामुळे तांदळाच्या किमतीवर परिणाम होणार आहे. रॉयटर्सच्या मते, भारत हा तांदळाचा सर्वात स्वस्त पुरवठा करणारा देश आहे. भारताने नायजेरिया, बेनिन आणि कॅमेरून या आफ्रिकन देशांना गहू आणि कॉर्नच्या किमतीत झपाट्याने घट करून वाचवले आहे. भारताने यापूर्वीच गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे