माळशिरस येथील ग्रामसभेने सरपंचाच्या विरोधातील अविश्वास ठराव धुडकावला

पुरंदर, दि.७ नोव्हेंबर २०२०: माळशिरस येथील सरपंच महादेव बोरावके यांच्यावर ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी मंजूर केलेला अविश्वास ठराव ग्रामसभेने आज धुडकावून लावला आहे. हा अविश्वास ठराव २९५ इतक्या प्रचंड मताधिक्याने धुडकावून लावला आहे.

माळशिरस ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी सरपंच महादेव बोरावके यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता.बोरवके हे जनतेतून निवडून आल्याने त्यांना ग्रामसभेने मंजुरी देणे म्हणजेच ग्रामसभेत अविश्वास ठरावच्या बाजूने मतदान होणे आवश्यक होते. या नुसार आज जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामसभेतून या प्रस्तावावर मतदान घेण्यातआले.

आज सकाळ पासूनच लोकांनी मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी दिवसभरात वेगवेगळ्या तीन बुथ मधुन मतदान घेण्यात आले. यावेळी बूथ १ – मध्ये ११७२ मतदार पैकी ६२३ मतदारांनी मतदान केले. बूथ २ मध्ये -११७० मतदार पैकी ६३७ मतदारांनी मतदान केले. बूथ ३ मध्ये ८०० मतदार पैकी ४६३ मतदारांनी मतदान केले. एकूण ३१४२ मतदारांपैकी १७२३ मतदारांनी मतदान केले.यामध्ये २५४ मते अवैध ठरली ठरावाच्या बाजूने
५८७ मते पडली तर विरोधात ८८२ मते पडली त्यामुळे
२९५ मतांनी हा अविश्वास ठराव फेटाळला गेला आहे.

याबाबतची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच गटविकास अधिकारी अमर माने यांनी जाहीर केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा