पाहुण्यांना जेवायला वाढलं आता आता बघूया घरच्याकडे कवा लक्ष देतात? शिंदे-फडणवीसांना खोत यांचा खोचक सवाल

मुंबई, ४ जुलै २०२३ : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश झाला. तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री आणि इतर आठ राष्ट्रवादीच्या आमदारांचा शपथविधी पार पडला आणि शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र यामुळे शिंदे गट, भाजप आणि युतितील मित्र पक्ष नाराज झाल्याचे पहायला मिळत आहे.

यावरून युतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या ज्यांनी सरकारमध्ये आणि युतीमध्ये प्रवेश केला त्यांचे आपण स्वागत करत असल्याचे म्हटले आहे. तर पावना नाराज होऊ नये म्हणून आधी त्याला जेऊ घालायचं असतं. तशी आपल्याकडे गावगाड्यातील रित आहे. त्यामुळे पाहुण्यांना पहिल्या पंक्तीला बसवलं, जेवायला वाढलय आता घरच्यांना वाढतील.

त्यामुळे घरच्यांनी अपेक्षा धरून आपलं खुश राहायचं असा सल्ला वजा टोमना त्यांनी शिवसेनेसह भाजमधील आमदारांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तर पहिल्यांदा पाहुण्याला वाढायचं असतं आता वाढलं आहे,आता बघूया घरच्यांकडे कवा ध्यान देताय ते असा सवाल खोत यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा