गोल पोस्ट आरोग्य कोरोनाव्हायरसची लस येईपर्यंत पंतप्रधानांनी लोकांना संयम बाळगण्याचे केले आवाहन.

कोरोनाव्हायरसची लस येईपर्यंत पंतप्रधानांनी लोकांना संयम बाळगण्याचे केले आवाहन.

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर २०२० : कोरोना व्हायरसची लस येईपर्यंत लोकांनी आत्मसंतुष्ट होऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना केले. गेल्या सात महिन्यांत देशाला संबोधित करताना आपल्या सातव्या भाषणात मोदी म्हणाले, कोरोनाविरूद्धच्या लढाईत जनतेने आजपर्यंत जनता कर्फ्यूपासून आत्तापर्यंत बराच दिर्घ प्रवास केला आहे.

ते म्हणाले, या साथीच्या रोगाची लस येईपर्यंत कोरोनाविरूद्धचा लढा कमकुवत होऊ नये. लॉकडाउन संपले तरी व्हायरस अद्याप गेला नाही हे विसरू नका याची पंतप्रधानांनी लोकांना आठवण करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले जे नि:स्वार्थपणे इतक्या मोठ्या जनतेची सेवा करीत आहेत.उत्सवाच्या उत्साहात सर्वानीच रहावे असे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधान म्हणाले, जगाच्या तुलनेत भारत अधिक जीव वाचवत आहे.

ते म्हणाले, देशात ९० लाखाहून अधिक बेड, १२ हजार क्वारंटीन सेंटर आणि दोन हजार कोविड लॅब उपलब्ध आहेत.पंतप्रधान म्हणाले, जगातील अधुनिक संसाधने असणा-या संपन्न देशांपेक्षा जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात भारत यशस्वी होत आहे.मोदी म्हणाले, देशातील मृत्यू दर कमी आहे आणि पुनर्प्राप्तीचा दर चांगला आहे.
कोविड लस सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी माध्यमांना जनजागृती करण्याचे आवाहनही केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version