दुसऱ्या पुलवामा हल्ल्याचा कट सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळला

जम्मू काश्मीर, दि,२८ मे २०२०: दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करुन पुलावमा सारखा हल्ला करणार असल्याचा कट सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. सुरक्षा दलाने एक मोठा कार बॉम्ब धमका घडवून आणण्याचा डाव उधळून लावला आहे.

याबाबत एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका सँट्रो कारमध्ये आयईडी (इंम्प्रोव्ह्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बसवण्यात आले होते. एक दहशतवादी ही गाडी चालवत होता. परंतु सुरूवातीला करण्यात आलेल्या गोळीबारानंतर अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी गाडी तेथेच सोडून तो पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय या गाडीला दूचाकीची नंबर प्लेट लावल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच या गाडीची कठुआमध्ये नोंदणी असल्याचेही उघड झाले आहे.

याबाबत जम्मू काश्मीर पोलिसांनी ही गाडी ट्रॅक करून बॉम्बचा शोध घेतला आहे. यानंतर बॉम्बस्कॉटच्या मदतीने कारसह आयईडी नष्ट करण्यात आले. या झालेल्या धमक्यात आजुबाजूच्या घरांचे नुकसान झाले आहे. हा धमाका होण्या अगोदर कारवर पाळत ठेवण्यात आली होती.

आजुबाजूच्या घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेल्यानंतर हा बॉम्ब नष्ट करण्यात आले असल्याची माहिती डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली.

मागील वर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामामध्येच अशाच हल्ल्यात ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा कट उधळून लावल्याने दहशतवाद्यांना चपराक देण्यात आली आहे. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा