तुळशी विवाह आणि बरच काही…

महाराष्ट्रात दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. यंदा आजपासून ते १२ तारखेपर्यंत तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत. तुळशी विवाह पार पडल्यानंतर लग्नाचे मुहूर्त काढले जातात. असे भारतीय सांस्कृतीत आहे. याविषयी आपण काही माहिती जाणून घेऊ या..

तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत करण्यात येतो. यामध्ये विष्णूचा तुळशीशी विवाह लावला जातो. भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय असून तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. तुळशी विवाह भारतीय संस्कृतीत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अगदी लग्नाच्या प्रथे प्रमाणे हा विवाह घरोघरी साजरा करण्याची पध्द्त आहे.

कसे असते तुळशी विवाहाचे स्वरूप

या दिवशी तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करून त्यामध्ये बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात, ठेवतात. या नंतर घरातील कर्ती व्यक्ती तुळस तसेच श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना हळद व तेल लावून स्नान घालतो. या नंतर विष्णूला जागे करून बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. तुळशीचे कन्यादान करावे. नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे.

परंपरा व उद्देश

हिंदू धर्मात तुळशीला पाप नाशिनी म्हणून संबोधले जाते. तसेच भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी ही वनस्पती आहे. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी किंवा मुख्यत: द्वादशीला करतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा