“त्या” दोघांमुळेच माझं तिकीट कापलं गेलं: एकनाथ खडसे

जळगाव : भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच माझं तिकीट कापलं गेलं. असा गंभीर आरोप भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. आमच्या सारख्या नेत्यांच्या मागे कुरबुरींचा तगादा लावल्याने आम्ही बाहेर पडू शकलो नाहीत, असं एकनाथ खडसे यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आपण शिवसेनेच्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे.शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्याला संपर्क केला आणि आपणही शिवसेनेच्या संपर्कात होतो असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच आपलं तिकीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच कापलं गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकनाथ खडसे यांनी उघडपणे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचं नाव घेत आरोप केले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा