मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ : यापूर्वी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने सर्वत्र खळबळ उडाली होती. सध्या पोलिस नितीन देसाई यांच्या मृत्यूचा कसून तपास करत आहेत. आर्थिक अडचणींमुळे नितीन देसाई यांनी एवढं मोठं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. काही वर्षांपूर्वी नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनीकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, नितीन देसाई हे कर्ज फेडू शकले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, नितीन देसाई मृत्यूप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या गंभीर आरोपांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नितेश राणे म्हणाले की, ‘चौकशीनंतर आमच्याकडे जी माहिती आहे ती समोर आणू. राणे म्हणाले की इंडस्ट्रीतील बहुतेक लोकांना जबरदस्ती कशी करायची हे माहित आहे. उद्धव ठाकरेंचा एनडी स्टुडिओवर डोळा असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनीही स्टुडिओ बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे नितेश राणे म्हणाले.
या आधी नितीन देसाई मृत्यूप्रकरणी संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतः बांधलेल्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस सध्या त्यांच्या मृत्यूचा तपास करत आहेत. नितीन देसाई मृत्यू प्रकरणातील आरोपी रशेस शहा आणि इतरांचे फोन बंद असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यासोबतच आरोपी घर आणि कार्यालयातून फरार असल्याचेही समोर आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड