सहारा रिफंड पोर्टल लाँच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते

सहारा रिफंड पोर्टल लाँच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते

नवी दिल्ली, १८ जुलै २०२३ : सहारा समुहाच्या गुंतवणुकदारांसाठी महत्वाची बातमी असुन सहारा इंडिया ग्रुपमधील गुंतवणूदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सहारा इंडिया रिफंड पोर्टल लाँच करण्यात आलं आहे. या पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या पोर्टलला सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक सहारा पोर्टल Central Registrar of Cooperative Societies-Sahara Portal असे नाव देण्यात आले आहे. याबरोबरच पैसे परत मिळण्याबाबतची सर्व महत्त्वाची माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे.

सहारा समुहाच्या गुंतवणुकीमध्ये लाखो भारतीय नागरिकांचे पैसे दीर्घकाळापासून अडकलेले होते. सहारा कंपनीत अनेक लोकांनी सर्व बचत गुंतवली असून ही गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याची वाट बघत होते. सहारा कंपनीच्या विविध योजनांमध्ये ग्राहकांनी पैसे जमा केले होते. तसेच सहारा समुहाचे गुंतवणूकदारांनी या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी करत होते. पण आता केंद्र सरकारकडून गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सहारा रिफंड पोर्टल सुरू झाल्यामुळे आता गुंतवणूकदारांना त्यांचे जमा पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सहारा समूहाचे बहुतांश गुंतवणूकदार हे मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील लोक आहेत. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतील गुंतवणूकदारांनी सहारामध्ये सर्वाधिक रक्कम गुंतवली आहे. काही गुंतवणूकदारांनी त्यांच्या कष्टाने कमावलेले सर्व पैसे टाकले आहेत. त्याविरोधात अनेक राज्यांत आंदोलनेही करण्यात आली आहेत. सहारा समूहाच्या ज्या सहकारी संस्थांमध्ये हजारो कोटी रुपये अडकले आहेत, त्यामध्ये सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह, हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह, सहारा युनिव्हर्सल मल्टिपर्पज, आणि स्टार्स मल्टिपर्पज यांचा समावेश आहे. सर्वाधिक पैसा सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्हमध्ये अडकलेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रिफंड पोर्टल लाँच करण्यात आलं आहे. हे पोर्टल फक्त खऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य ओळख माहिती आणि पुरावे सादर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. सहारा इंडियामध्ये देशभरातील लाखो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये अडकले आहेत. लोक त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याची वाट पाहत होते. सहारा इंडियामधील गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही अनेक लोकांना पैसे परत मिळालेले नाहीत, तर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सहारा वाद २००९ मध्ये सुरू झाला होता. सहारामध्ये सहारा हाऊसिंग कंपनी लिमिटेड आणि सहारा रिअल इस्टेट कंपनी लिमिटेड या दोन कंपन्या होत्या. सहारा कंपनीने सेबीकडे IPO सादर केल्यावर हा वाद सुरू झाला. आयपीओ सादर नंतर कंपनीची सर्व गुपिते बाहेर आली. सहाराने गुंतवणूकदारांकडून २४० कोटी रुपये बेकायदेशीरपणे उभे केले होते. सेबीच्या तपासानंतर कंपनीच्या अनेक फसव्या कारवाया आणि मोठा घोटाळा समोर आला. यानंतर सेबीने सहाराला गुंतवणूकदारांना व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश दिले होते, पण सहाराचे गुंतवणूकदार अजूनही त्यांच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र आज सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक सहारा पोर्टल लॉन्च करू गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपलेली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा