उस्मानाबाद येथे आजपासून मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

उस्मानाबाद : अखिल भारतीय ९३ वे साहित्य मराठी साहित्य संमेलन आजपासून उस्मानाबाद येथे सुरु होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे असणार आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली येत्या रविवारपर्यंत (दि.१२) जानेवारीपर्यंत हे संमेलन चालणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्याकडून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने सुरुवात होईल. संत साहित्य आणि परिवर्तनवादी साहित्य मांडणारे ग्रंथ पालखीत असणार सकाळी ११ वाजता ध्वजारोहण तर उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
या संमेलनासाठी राज्यभरातील प्रकाशनांची २०० हुन अधिक दालने उभारण्यात आली आहेत.
यावेळी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, उद्घाटक ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, साहित्य संमेलनाचे निमंत्रक नितीन तावडे इ.उपस्थित राहणार आहेत.
माजी संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, डॉ.सदानंद मोरे, डॉ.श्रीपाल सबनीस आणि लक्ष्मीकांत देशमुख इ.यांचा यावेळी विशेष सन्मान देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाला काही कडव्या संघटनांचा विरोध असल्यामुळे संमेलन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ कवी व उद्घाटक ना. धों. महानोर यांना संमेलनाला न जाण्याची फोनद्वारे धमकी दिली गेली असल्याने त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.त्यामुळे संमेलनावर वादाचे सावट असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

दरम्यान, मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी संमेलनास उपस्थित असले तरी त्यांना व्यासपीठावर न बसवता, पहिल्या रांगेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.अशी माहिती संमेलन मंडळाकडून देण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा