पुणे, ४ ऑक्टोबर २०२२ : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा व शेवटचा टी ट्वेंटी सामना आज खेळवला जाणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारताने आफ्रिकेचा सलग दोनवेळा पराभव करून टी-ट्वेंटी मालिका आपल्या खिशात घातली आहे.
भारताने आफ्रिका विरुद्धची मालिका जिंकली आहे. त्यातील उर्वरित सामना आज होणार आहे. त्यामुळे टीम मधील काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. विराट कोहली आणि के एल राहुल यांना दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच टीम इंडिया साठी टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या आधी ही शेवटची मालिका असणार आहे.
दरम्यान आजच्या सामन्यामध्ये विराट कोहली ऐवजी श्रेयस अय्यर ला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.तसेच केएल राहुल च्या जागी ऋषभ पंतला सलामीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
गोलंदाजीचा विचार केल्यास भारतीय गोलंदाजी खूप कमकुवत असल्याचं दिसून आला आहे. जसप्रीत बुमराह ची उणीव टीम इंडियाला जाणवत आहे.आजच्या सामन्यात यूजवेंद्र चहल,रविचंद्र अश्विन, व मोहम्मद सिराज, उमेश यादव यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता मालिका जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात संधी मिळू शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव