‘विरोधात बोलल्यास जिवंत गाडू’: रघुराज सिंह

अलीगढ: उत्तर प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री रघुराज सिंह यांनी अलीगढ येथे एक रॅली आयोजित केली होती. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनात अलिगढ येथे आयोजित केलेल्या रॅलीत त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडू”, असं रघुराज सिंह आपल्या भाषणात म्हणाले. रघुराज सिंह यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने नवीन वाढ उद्भवण्याची शक्यता आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठात सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. याचा विरोध दर्शवण्यासाठी रघुराज यांनी मोदी आणि योगींविरोधात बोलणाऱ्यांना गडून टाकू असं वक्तव्य केलं आहे.

हे बोलताना रघुराज काँग्रेस वर घसरले. त्यांनी काँग्रेस वर ही टीका केली. टीका करताना त्यांनी नेहरूंचा विषय काढला. नेहरुंची जात कोणती? त्यांचं कोणतचं घरणं नव्हतं, असा हल्लाबोल रघुराज यांनी केला. पुढे ते म्हणाले की, मोदी आणि योगींविरोधात कोणतेही विधान खपवून घेतले जाणार नाही. हा सर्व धर्मांचा आहे पण सी ए ए वरून मोदींना बोललेले भाजपा कडून खपवून घेतले जाणार नाही. रघुराज हे आधीपासूनच असल्या वक्तव्यं साठी चर्चेत राहिले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा