सरकारला पूर्ण बहुमत असताना राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती? उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल

यवतमाळ, १० जुलै २०२३ : उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भा दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर संजय राठोड यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. छगन भुजबळ शिवसेनेत होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. इथपर्यंत ठिक आहे. पण, आता पक्ष संपवण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवली जाते.

देशभर विरोधकांवर ईडी, सीबीआयची छापे मारले जात आहेत. परंतु मणिपूरमध्ये हिंसाचार चालू आहे याकडे कोणाचाही लक्ष नाही. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान करत ईडी आणि सीबीआयचे अधिकारी मणिपूरला पाठवा, काय होते ते पहा असा इशारा दिला. तर आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस वर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करताच अजित पवारांसह राष्ट्रवादी पक्ष फुटला,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही तुमच्यावर बोलतो. तुम्ही आमच्यावर बोला. शेवटी जे ठरवायचे ते जनता जनार्दन ठरवत असते. याला लोकशाही म्हणतात.मत कुणालाही द्या, सरकार माझेच येणार. आधी मतपेटीतून सरकार जन्माला येत होते. आता खोक्यातून सरकार जन्माला येत आहे. आधी आमचे आमदार फोडले. अपक्षही नेले. पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची गरज होती का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा