पुणे, 29 ऑक्टोंबर 2021: 27 ऑक्टोबर 2021 रोजी ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताच्या अणुशक्ती सक्षम असणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रेंज 5000 किमी आहे. भारत सरकारचे धोरण हे आहे की भारत कोणत्याही देशावर प्रथम आक्रमण करणार नाही. याचा अर्थ सध्या जी चाचणी घेतली जाते ती लष्करी क्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी आहे. या क्षेपणास्त्राने आशियातील अनेक शहरांना लक्ष्य केले जाऊ शकते. सरासरी, एक व्यक्ती 6 सेकंदात एकदा डोळे मिचकावते. केवळ तेवढ्या वेळात हे क्षेपणास्त्र सुमारे ५० किलोमीटर अंतरावर जाईल.
काही दिवसांपूर्वी चीनसह अनेक देशांनी अग्नी-5 क्षेपणास्त्राबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र भारताने याआधी सात वेळा अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. चीनची नाराजी आहे कारण त्याचा संपूर्ण देश अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या कक्षेत येत आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून वाचू शकतील अशी चीनमध्ये एकही शहरे नाहीत. अग्नी-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (Agni-V ICBM) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे.
अग्नी-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (Agni-V ICBM) 50 हजार किलो वजनाचे आहे. ते 17.5 मीटर लांब आहे. त्याचा व्यास 2 मीटर म्हणजेच 6.7 फूट आहे. याच्या वर 1500 किलो वजनाचे अण्वस्त्र बसवले जाऊ शकते. या क्षेपणास्त्रामध्ये तीन-स्टेज रॉकेट बूस्टर आहे जे सॉलिड फ्ल्युल वर उडते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट जास्त आहे. म्हणजेच ते एका सेकंदात 8.16 किलोमीटरचे अंतर कापते. हे मिसाईल ताशी 29,401 किलोमीटर वेगाने शत्रूवर हल्ला करते. यात रिंग लेझर जायरोस्कोप इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम, जीपीएस, नेव्हीआयसी सॅटेलाइट नेव्हिगेशन टेक्नोलॉजी आहे.
अग्नी-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (Agni-V ICBM) आपल्या लक्ष्यावर अचूक मारा करते. काही कारणास्तव, अचूकतेमध्ये फरक असला तरीही, तो फक्त 10 ते 80 मीटर असेल. पण हा फरक क्षेपणास्त्राची मारक क्षमता कमी करत नाही. ते लॉन्च करण्यासाठी ग्राउंड-माउंटेड मोबाइल लाँचर वापरला जातो. हे मिसाईल ट्रकवर लोड करून रस्त्याने कोणत्याही ठिकाणी नेले जाऊ शकते. शास्त्रज्ञ एम. नटराजन यांनी 2007 मध्ये पहिल्यांदा या क्षेपणास्त्राची योजना आखली होती.
भारताने हे मिसाईल डागले तर ते संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिकेच्या काही भागांवर हल्ला करू शकते. या मिसाईलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे MIRV तंत्रज्ञान (Multiple Independently Targetable Re-entry Vehicles). या तंत्रात क्षेपणास्त्रावर बसवलेल्या वॉरहेडमध्ये एकाच शस्त्राऐवजी अनेक शस्त्रे बसवता येतात. म्हणजेच मिसाईल एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते.
असे मानले जाते की अग्नी-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (Agni-V ICBM) स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये तैनात केले जाऊ शकते. या कमांडखाली भारताची सर्व क्षेपणास्त्रे चालवली जातात. यामध्ये पृथ्वी, अग्नी आणि सूर्यासारख्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. सूर्या मिसाईल अजून तयार झालेले नाही. त्याची रेंज 12 ते 16 हजार किलोमीटर असेल. त्याआधी अग्नी-6 तयार केले जाईल जे 8 ते 12 हजार किमीच्या रेंजचे असेल. या कमांडमध्ये समुद्रात असलेल्या लष्करी क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. जसे- धनुष, सागरिका इ.
अग्नी-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Agni-V ICBM) पहिली यशस्वी चाचणी 19 एप्रिल 2012 रोजी झाली. त्यानंतर 15 सप्टेंबर 2013, 31 जानेवारी 2015, 26 डिसेंबर 2016, 18 जानेवारी 2018, 3 जून 2018 आणि 10 डिसेंबर 2018 रोजी यशस्वी चाचण्या झाल्या. अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या एकूण सात यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्यांमध्ये या क्षेपणास्त्राची वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये हे क्षेपणास्त्र शत्रूला नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम शस्त्र असल्याचे आढळून आले. त्याची अचूकता, वेग आणि विनाशकारी शक्ती शत्रूला घाम फोडेल.
50 हजार किलो वजनाचे हे अग्नी-5 मिसाईल 200 ग्रॅम वजनाच्या कंट्रोल अँड गाइडेंस सिस्टमद्वारे नियंत्रित केले जाते. ते या मिसाईलवरच बसवले आहे. त्याला सिस्टम ऑन चिप (एसओसी) आधारित ऑन-बोर्ड कंप्युटर म्हणतात. अग्नी-5 मिसाईलमध्ये एमआयआरव्ही तंत्रज्ञान म्हणजेच अनेक वॉरहेड्सची चर्चा होत होती. यामध्ये मिसाईलच्या नाकावर दोन ते दहा शस्त्रे बसवता येतात. म्हणजेच एकच मिसाईल अनेकशे किलोमीटरवर पसरलेल्या 2 ते 10 वेगवेगळ्या लक्ष्यांवर एकाच वेळी अचूक मारा करू शकते. असे देखील होऊ शकते की जर लक्ष्य खूप मोठे असेल तर त्याच मिसाईलचे 10 वॉरहेड त्याचे वेगवेगळे भाग नष्ट करतील. जेणेकरून शत्रूला डोके वर काढण्याची संधी मिळणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे