राज्यात थंडीचा पारा सरासरीच्या ३.३ अंशांनी कमी; पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढणार

पुणे, १ डिसेंबर २०२२ : पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढत आहे. हिमालयीन भागात एक डिसेंबरपासून हा चक्रवात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. परिणामी राज्याच्या सर्वच भागांत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे. बुधवारी राज्यात थंडीचे प्रमाण वाढले असून, किमान तापमानाचा पारा सरासरीच्या ३.३ अंश कमी झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २ आणि ३ डिसेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात बुधवारी सर्वांत कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे ११.९ अंश झाली होती. त्यामुळे पुढील चार दिवस साधारण थंडीबरोबर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही वर्तविली जात आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सहा जिल्ह्यांत पुढील तीन दिवस किमान तापमान सरासरीपेक्षा २-४ डिग्रीने वाढलेले असल्यामुळे विशेष थंडी जाणवणार नाही. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात ३० नोव्हेंबरपासून आठवडाबर साधरण थंडी जाणवेल, असा अदांज व्यक्त केला जात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा