लॉकडाऊन दरम्यान राज्यात १ लाख ४५ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि. ४ जुलै २०२० : २४ मार्चला लॉकडाऊन घोषित केल्यानंतर पूर्ण देशभर संचारबंदी लागू करण्यात आली होती. या दरम्यान राज्यांमध्ये देखील संचारबंदी व अनेक गोष्टींवर प्रतिबंध लादण्यात आले होते. या दरम्यानच्या काळामध्ये १८८ नुसार १ लाख ४५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच २९,६०७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्ली.

यादरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ५२ हजार ३८ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या २९२ घटना समोर आल्या आहेत या अंतर्गत ८६१ व्यक्ती ताब्यात घेण्यात आल्या आहे. १०० नंबरवर १ लाख ०५ हजार ६९५ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

पोलिसांनी हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून विलगीकरणात ७८४ व्यक्ती पाठविलेल्या आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर १३३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे दाखल केलेल्या या वाहानांपैकी ८६ हजार ३०६ वाहने कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे या दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना राज्यातील ६४ पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये मुंबईतील ३९ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ४०, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ३, ठाणे ३, ठाणे ग्रामीण १ पोलीस व १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना SRPF १ अधिकारी, उस्मानाबाद-१, नवी मुंबई SRPF- १ असे आहेत. तसेच राज्यात कोरोना बाधित १११ पोलीस अधिकारी व ९२९ पोलीस कर्मचारी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा