माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय संन्यास

नांदेड, दि.२८ मे २०२० : नांदेडच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतला असल्याची महिती त्यांनी फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. याबद्दल त्यांनी भावनिक पोस्ट लिहून सूर्यकांता पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केला. ४३ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी रामराम ठोकला आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ४३ वर्ष एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. ४०० रुपयांची साडी ४००० हजाराच्या थाटात नेसली, मिळालेले काम मन लावून केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अश्या अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही.
राजीनामा लिहून तयार होता, पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा’ असं त्यांनी फेसबुकवर लिहिले आहे.

सूर्यकांता पाटील यांनी आपली सुरुवात कॉंग्रेमधून केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये त्यांचे मन रमताना दिसत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली होती.

पाटील यांनी १९८० मध्ये त्या हदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारपदी निवडून आल्या होत्या. १९८६ मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसकडून राज्यसभेवर गेल्या होत्या. १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा त्या लोकसभेत खासदारपदी निवडून आल्या.

त्यांनी राजकीय संन्यास का घेत आहोत याचे कारण संगण्यास अद्याप तरी नकार दिला आहे. मात्र नांदेड जिल्हयात या बातमीने शांतता पसरली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा