आपल्या शरीराची पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्यास मलावरोधाची तक्रार उद्भवू शकते, तसेच डोकेदुखीचाही त्रास होऊ शकतो. अश्या वेळेला या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता थोडे थोडे पाणी सतत पीत राहण्याने या तक्रारी दूर होण्यास मदत मिळेल.
शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी झाल्यास डोळे कोरडे पडणे किंवा श्वासास दुर्गंधी येणे अश्या तक्रारी उद्भवतात. अश्या वेळी पाणी पिण्याचे प्रमाण वाढविल्याने या तक्रारी दूर होतात. पुष्कळदा दिवस भराच्या कामानंतर हलकी अंगदुखी किंवा सांधे दुखी सुरु होते. विशेषतः शारीरिक श्रम करणाऱ्यांना पायात गोळे येणे किंवा स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणे यासारखे प्रकार घडू शकतात. या तक्रारी दूर करण्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे.
जेवण झाल्यानंतर देखील भूकेची भावना होत असेल, तर हे ही शरीरामध्ये पाणी कमी असण्याचे लक्षण असू शकते. अश्या वेळी काही खाणे टाळून, पाणी प्यावे. या मुळे शरीरामध्ये निर्माण झालेली भूकेची भावना शमेल, तसेच खाल्लेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होईल.
न्यूज अनकट













































