ऐश्वर्याच्या प्रेमाने संपवलं विवेक ओबेरॉयचं करियर.. काय आहे विषय ?

पुणे, ३ सप्टेंबर २०२२: आज विवेकचा ४६ वा वाढदिवस. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या एका मोठ्या घटनेबद्दल. म्हणजे त्याच्या प्रेमाबद्दल. असं प्रेम ज्याने विवेकच्या करियरला मोठा झटका बसला.

विवेकचा जन्म ३ सप्टेंबर १९७६ रोजी हैदराबाद येथे झाला. विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय हे देखील बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेते आहेत.. विवेक ओबेरॉयने २००२ मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या कंपनी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला ‘फिल्मफेअर अवॉर्ड’ही मिळाला.

एकेकाळी बॉलीवुड गाजवलेल्या आणि नंतर पूर्णतः त्यातून बाहेर पडलेल्या अभिनेता विवेक ओबेरॉय च्या करियरपेक्षा त्याचे वैयक्तिक आयुष्यच अधिक चर्चेत राहिले आहे. म्हणजेच त्याच्या अभिनयापेक्षाही त्याचे ऐश्वर्या रायसोबत असलेले प्रेम अधिक चर्चेत राहिले. पण हे सगळं सलमान खानच्या नजरेत आले आणि विवेकचे करियर हळू हळू संपायला लागले. ऐश्वर्या आणि सलमानची भेट ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. १९९९-२००१ पर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले. पण, नंतर त्यांचे नाते तुटले. दरम्यान, विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्यात जवळीक वाढली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

एका पत्रकार परिषदेत विवेक म्हणाला, सलमानकडून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. त्याने मला तब्बल ४२ वेळा फोन केला आहे. हे शब्द सलमानच्या जिव्हारी लागले आणि या घटनेनंतर विवेकचं आयुष्यच बदलून गेलं. जिच्यासाठी विवेकने एवढं मोठं पाऊल उचललं, ती ऐश्वर्याही त्याची साथ सोडून गेली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या करियरला उतरती कळा लागली. त्यावेळी सलमानचे मनोरंजन विश्वात मोठे स्थान निर्माण झाल्याने विवेकचे अनेक चित्रपट त्याने काढून घेतले असे ही बोलले जाते. त्यामुळे विवेकला आपल्याच चुकीमुळे मनोरंजन विश्वाला रामराम करावा लागला. यानंतर त्याने २०१० मध्ये कर्नाटकचे माजी मंत्री दिवंगत जीवराज अल्वा यांची कन्या प्रियांका अल्वा हिच्याशी विवाह केला आणि तो आत्ता सुखी जीवन जगत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा