आमिर खानच्या नव्या जाहिरातीवरून वाद

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२२ : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आमिर खान खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चेत आहे.गेल्या महिन्यातच त्याच्या ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता आमिर खान एका जाहिरातीच्या निमित्ताने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावरती आमिर खान वर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.

ही जाहिरात एका बँकेची आहे. ज्यामध्ये कियारा आणि अमीर वधू – वर दाखवण्यात आलेत, दोघेही लग्ना नंतर नववधूच्या घरी येतात घरामध्ये पहिला प्रवेश कोणी करायचा यावरून दोघांमध्ये चर्चाही रंगते, वर ही घर जावई होऊ शकतो हे या जाहिरातीत दाखवण्यात आलंय. यामुळे आमिर खान खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. काही युजर्सना आमिर आणि कियाराची नविन जाहिरात आवडलेली नाही. तर काहीनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्रीने देखील ट्विट करत सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सुद्धा या जाहिरातीला विरोध केला आहे. नरोत्तम मिश्रा यांचे म्हणणे आहे, की अशा जाहिरातींमुळे धर्माच्या भावना दुखावत आहेत. धार्मिक परंपरा आणि प्रथा यांचे भान असलं पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा