घनसावंगीचे आमदार निष्क्रिय, त्यांनी सत्तेसाठी जनतेची दिशाभूल केली- सतीश घाटगे

घनसावंगी, जालना ८ जुलै २०२४ :जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघातील जनतेला खोटी आश्वासने देऊन २५ वर्षे आमदार राहिलेल्या राजेश टोपे यांनी जनतेची दिशाभूल केलीय. विकासाचे खोटे स्वप्न दाखवून जनतेला अविकसित ठेवण्याचे काम केल असल्याचा आरोप भाजपा नेते सतीश घाटगे यांनी केलाय.

जनता आता परिवर्तन करणार असून घनसावंगी विधानसभेचा पुढचा आमदार हा महायुतीचाच होणार, असा विश्वास समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी व्यक्त केलाय. जालना तालुक्यातील थेरगाव येथे भाजपच्या युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या १५४ व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी घाटगे बोलत होते. थेरगावातील सांडपाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी सतीश घाटगे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीतून भूमिगत गटार नालीच्या कामाचे उद्घाटन सतीश घाटगे यांनी केले. या कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा