उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये प्रवासी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हि बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला ही बस जात होती.
अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४३ प्रवासी होते. ट्रक आणि बसच्या अपघातानांतर बसला आग लागली.
दरम्यान, आगीची तीव्रता अधिक असल्यानं बसमधील प्रवाशांना बाहेर पडणं कठीण झालं होतं. यामध्ये २० प्रवाश्यांचा मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झालेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत जखमींना ५० हजार रूपये तर मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपयांची मदतीची घोषणा केली आहे.