कदम वाकवस्ती येथे पाणीपुरी विकणाऱ्या मुलाने केली आत्महत्या

कदम वाकवस्ती, दि. २ जुलै २०२० : येथे काल दि. ०१ जुलै २०२० रोजी अजय उर्फ जितेंद्र सत्यकुमार मौर्य या मुलाने पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. अजय उर्फ जितेंद्र सत्यकुमार मौर्य असं या २५ वर्षीय मुलाचं नाव आहे. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सत्यकुमार मौर्य हे उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असून त्यांचा चार वर्षांपासून कदमवाकवस्ती तारा हाईट, या बिल्डींगच्या शॉप मध्ये पाणीपुरी विकून आपली उपजीविका करत होता.

परंतू काल त्याने याच शॉप मध्ये पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. चार वर्षांपासून येथील कदमवाकवस्ती, परिसरातील इमारतीत सत्यकुमार मौर्य राहायचा. बराच वेळ होऊन देखील तो उठला नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी मौर्य यांना शॉप मध्ये पहिल्यास शॉप चे शटर बंद दिसले व शटर आतून लॉक आढळून आले व आतून वास येत होता. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जेसीबी च्या साह्याने शॉपचे शटर तोडले तेव्हा तो पोलिसांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

त्यानंतर त्याला तात्काळ खाली उतरवण्यात आले . सत्यकुमार मौर्य यांनी एक चिट्टी लिहून ठेवली होती ती पोलिसांना मिळाली असता त्यानी त्या चिट्टी मध्ये मी स्वतः आत्महत्या करत आहे व कोणालाही दोषी ठरवू नये असे मौर्य यांनी चिट्टी मध्ये लिहून ठेवले होते. आत्महत्या का केली, याचा तपास सध्या लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा