गोल पोस्ट राष्ट्रीय या राज्यात आज पासून मास्क न घातल्यास एक लाख रुपये दंड

या राज्यात आज पासून मास्क न घातल्यास एक लाख रुपये दंड

रांची, दि. २३ जुलै २०२०: झारखंडमध्ये कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्याने आणि मास्क न घातल्यास १ लाख रुपये दंड आणि २ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. झारखंड मंत्रिमंडळाने गुरुवारी संसर्गजन्य रोग अध्यादेश २०२० संम्मत केला. सिक्युरिटी प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांना आणि मास्क न घालणाऱ्यांना १ लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

यासह, जर एखाद्याने नियमांचे उल्लंघन केले किंवा नवीन नियमांतर्गत मास्क घातला नसेल तर त्याला २ वर्ष तुरूंगात रहावे लागू शकते. तथापि, आज उल्लंघन करणार्‍यांना रोखण्यासाठी रस्त्यांवर कोणतेही तपासणी यंत्रणा पहावयास मिळाली नाही. राजधानी रांचीच्या रस्त्यावर अनेकांना मास्कशिवाय पाहिले गेले.

वास्तविक झारखंडमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे, आता सरकारी रूग्णालयात जागा नाही. रांचीच्या स्टेशन रोडवर राहणाऱ्या लोकांच्या सरकारच्या निर्णयाला विरोध होत असला तरी आता खासगी रुग्णालय आणि बँक्वेट हॉलचा उपयोग आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यासाठी केला जाईल, असा सरकारने निर्णय घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version