राज्य सरकारचा मोठा निर्णय; ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार ५० हजार रुपये

मुंबई, २० ऑक्टोबर २०२२: राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नियमित कर्जाची परतफेट करणाऱ्या जवळपास ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये शासनाने ५० हजार रुपये पाठवले आहेत.

हा महत्वपुर्ण निर्णय आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली. दिवाळीनिमित्त शासनाने शेतकऱ्यांना खास भेट दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा